अंबादेवी
हे महाराष्ट्रातील अनेक कुटूंबियांचे कुलदैवत आहे. भगवान श्रीकृष्णाने कौंडण्यपूरहून रुक्मिणीचे हरण करून अंबादेवी मंदिरात लग्न केले. नवरात्रीत 9 दिवस येथे मोठी यात्रा भरते. हे प्राचीन मंदिर 1000 वर्ष जुने आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठविली होती. जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून हे मंदिर आहे. अंबादेवीची मूर्ती अतिशय पुरातन आहे. हे मंदिर मुगलांनी उध्वस्त केले होते. इ.स.1660 च्यास सुमारास श्री.जनार्दन स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्या बाई होळकर यांचेही या मंदिराच्याद उभारणीत मोलाचे योगदान आहे. विदर्भातील प्राचीन शहर अमरावती पौराणिक दृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. कौंडिण्यपूर येथील विदर्भात राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली कन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरविला होता, जो तिला मान्य नव्हता. तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच ते कौंडिण्यपूरला आले व त्यांनी रुख्मिणीचे हरण केले. अमरावतीला अंबादेवी मंदिरात त्या दोघांनी विवाह केल्याची अख्यायिका आहे. या अंबादेवी मंदिरात रुक्मिणीने देवीला साकडे घालून इच्छित वराचं दान मागितलं. प्रकटलेल्या अंबादेवीने रुक्मिणीला फुलांची माळा दिली. लग्नाला विरोध करणाऱ्या रुक्मिणीच्या भावाला पराजित करून श्रीकृष्ण तिला आपल्यासोबत द्वारकेला घेऊन गेले.
अमरावती विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीसोबत लग्न करून तिचे हरण केले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे. प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते.

